पंजाब नॅशनल बँकेनं

पंजाब नॅशनल बँकेनं (PNB) मोठा निर्णय घेतलाय. गेल्या तीन वर्षात कोणत्याही प्रकारचे व्यवहार झाले नसलेली आणि शून्य शिल्लक असलेली बँक खाती एका महिन्यानंतर बंद करण्यात येणार आहेत. ज्या खात्यावरुन कोणत्याही प्रकारचे व्यवहार होत नाहीत, ती खाती बंद केली जाणार आहेत. कोणत्याही प्रकारचा गैरवापर होऊ नये म्हणून ही दक्षता घेण्यात येत आहे. त्यामुळं ज्या ग्राहकांची पंजाब नॅशनल बँकेत खाती आहेत, त्यांनी याबाबतची सविस्तर माहिती घेणं गरजेचं आहे.