rbi new rule

बहुतेक पगारदार लोक बँकेच्या सेव्हिंग (बचत) खात्यात गुंतवणूक करण्यास प्राधान्य देते. बचत खाते उघडताना बँकांनी ग्राहकांना घातलेली अट म्हणजे बँक खाते उघडल्यानंतर खात्यात किमान शिल्लक ठेवणे अनिवार्य असेल. प्रत्येक बँकेवर खात्यातील किमान शिल्लक मर्यादा वेगवेगळी असतात. जर ग्राहकाच्या खात्यात किमान शिल्लक नसेल तर खात्यातून दंडाची रक्कम कापली जाते परंतु, असे करणे आरबीआयच्या नियमांच्या अधीन आहे.

रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार किमान शिल्लक नसतानाही ग्राहकाच्या खात्यातून बँक पैसे कापू शकत नाही. त्याचवेळी, दंडाच्या नावाखाली कपात करून बँक ग्राहकांचे खाते नकारात्मक करू शकत नाही. तरीही कोणत्याही बँकेने असे केल्यास आरबीआयकडे जाऊन तक्रार करण्याचे ग्राहकांना अधिकार देण्यात आले आहेत.